शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राज्याच्या मुख्य गृहसचिवांशी चर्चा , अनिकेत कोथळे खूनप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:33 IST

कडेगाव : सांगलीत पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला.

कडेगाव : सांगलीत पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कोथळेचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. खाकी वर्दीला काळिमा फासणाºया आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार पतंगराव कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याकडे केली.मुंबई येथे मंत्रालयात कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव श्रीवास्तव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, कामटे आणि त्याच्या सहकाºयांनी अतिशय क्रूर कृत्य केले आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्री, मटका, सावकारी असे धंदे राजरोस सुरू आहेत. चोºया, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहेत. हप्ते घेणारे, गुन्हेगारांना आश्रय देणारे, कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले पोलिस अशी पोलिसांची प्रतिमा झाली आहे, सांगलीतील घटनेने पोलिसांची बदनामी झाली आहे. यामुळे राज्याच्या गृह विभागाने कठोर पावले उचलून सांगली पोलिस प्रशासनात योग्य ते बदल केले पाहिजेत, असे गृह सचिवांना सांगितले आहे.खरे गुन्हेगार, गँगवॉरमधील गुंड पोलिसांना सापडत नाहीत आणि निष्पाप व्यक्तींवर मस्तवाल अधिकारी दादागिरी करतात. जनतेची विश्वासार्हता पोलिसांनी गमावली आहे.ठोस उपाययोजना!गृह विभागाचे सचिव श्रीवास्तव यांनी गृह विभागाच्या संबंधित प्रमुख अधिकाºयांशी तात्काळ संपर्क साधला. याबाबत स्वत: लक्ष घालून योग्य त्या ठोस उपाययोजना तात्काळ करीत असल्याचे आश्वासन त्यांनी कदम यांना दिले.मुंबई येथे गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याशी सांगली घटनेबाबत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी चर्चा केली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसSangliसांगली